Ad will apear here
Next
मराठे व इंग्रज
पेशव्यांचे राज्य बुडाले, त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ‘मराठेशाहीचे शतसावंत्सरिक श्राद्ध’ असे पुस्तक लिहिले, तेच हे पुस्तक. पूर्वरंग आणि उत्तरांग असे पुस्तकांचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात इंग्रजांपूर्वीचा महाराष्ट्र, इंग्रज हिंदुस्थानात का व कसे आले, या प्रश्नांचा मागोवा घेऊन मराठा राजमंडळ व इंग्रज यांवर चर्चा केली आहे.

उत्तरार्धात विवेचानात्मक भाग अधिक आहे. मराठे व इंग्रज यांचा समकालीन उत्कार्षापकर्ष, मराठेशाही कशाने बुडाली?, मराठेशाहीची राज्यव्यवस्था, मराठ्यांचे पातशाही धोरण, असे विषय हाताळले आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी उपोद्घात केला आहे. एकूणच मराठ्यांचे सार्वभौम राज्य इंग्रजांनी कसे नष्ट केले व ताब्यात घेतले, याचे सर्वकश चित्र पुस्तकातून समोर येते.

प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : ३१२
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZZCBO
 Incisive analysis.
It is relevant , even today .

R
 Not propaganda in the form of history .
Will it be popular today ?
 It goes a long. Way to explain why the rule became acceptable ,
Indeed , preferable to the rule of the Peshawas .
 Some light on the subject is thrown in the recently published book
Anarchy , written by William Dalrymple . Ostensibly , it is about the
East India Company . But we know a lot about the political situation
In India , during the period covered by the book . It is well-researched .
Similar Posts
छत्रपती शिवाजी महाराज महाप्रतापशाली शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृ. अ. केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती १९०६मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याची नववी आवृत्ती वाचकांसाठी सध्या उपलब्ध आहे.
उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा
संपूर्ण पंचतंत्र प्राचीन भारतीय लोककथांचा हा सर्वाधिक लोकप्रिय संग्रह मानला जातो. या संग्रहातील सत्तराहून अधिक लोककथा पाच भागांत विभागल्या आहेत. पंचातंत्रांची रचना शास्त्रविमुख राजपुत्रांना नीतिशास्त्रज्ञ बनविण्यासाठी झाली आहे. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या पंचातंत्राचा ह. अ. भावे यांनी केलेला हा अनुवाद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक रा
न. चिं. केळकर, प्रा. रा. ग. जाधव १५ हजार पृष्ठांइतकी विपुल साहित्यनिर्मिती करणारे साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि आपल्या अष्टपैलू समीक्षेने ओळखले जाणारे प्राध्यापक डॉ. रा. ग. जाधव यांचा २४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language